आयुष्य कसे क्षणार्धात बदलुन जाईल हे कोणत्याच आयुष्यात घडणाऱ्या घटनांचा भाष्यकार पण कधीच सांगू शकणार नाही…याला कारण ही तसेच असते… जलद गतीने धावणाऱ्या जगाला शांतता समुद्रकिनारी किंवा गिर्यारोहण करताना हमखास प्राप्त होयची परंतु आता वेळच अशी आलीय…जग पूर्णपणे शांत झालेय पण मनाचे काय..? त्यात मात्र खूप चलबिचल सुरू आहे…विचार कशाचा करायचा याचा पण मनात विचार घोळत नाहीये खूप गोंधळ सुरू आहे, पूर्णपणे त्रेथातिरपट उडालीय…जे सुरू आहे ते योग्य की अयोग्य हे पण कळायला मार्ग नाही… सद्यस्थितीत आहे ते योग्यच आहे हेच समजायचं आणि पुढे चालत राहायचं… शेवटी एकच गोष्ट ध्यानात धरायची… जे काही होतेय ते चांगल्यासाठीच बाकी काही नाही…
🙃
सुमित चौधरी
27 May 2020
Leave a Reply
You must be logged in to post a comment.