8 नोव्हेंबर 2018
माय, सरकारनं नोटबंदीच दोन वरश्यपूर्वी लावलेलं झाड आज सुकून गेलंय…
मी त्याचा बड्डे हाय म्हणून लेमनच्या गोळ्या अन चार पार्ले बिस्केट घेऊन गेलते.
मनाला खूप दुःख झालं.
माझ्या डोळ्याला आवरता आलं नाही…
मी धो-धो रडू लागले…
सरकारनं तुझ्या-माझ्या जनतेला किती अपेक्षा दिल्या…त्यांची फळं फार गोड अस्त्यात म्हणे अन त्याची घनदाट सावली सरकारी ए.सी.पेक्षाही गार असते…
आम्ही त्याची हवा खाणार होतोत पण काळ बदलला; आमच्या तोंडातलं आलं…
असो…
माझ्या मनात विचार आलंय.
तुम्ही सगळे ‘नोटबंदी’ वृक्षाकडे या; बिना केकच… मी इथंच हाय… आपुन पिंट्याच्या दुकानावरून मेणबत्त्या घेऊयात अन सरकारनं रचलेल्या ‘नोटबंदी’ कार्यक्रमात मृत्यूच्या चक्रात अडकलेल्या वाटसऋणा श्रदांजली देऊयात…
आणि भविष्याने ‘आम जनतेचं नुकसान होणार’ याची धोरणं आखावीत… काळावर ‘नुकसान भरपाई’चे घोषणपत्र लादू नये…
परिस्थितीने आपल्या माणसांना आपल्यापासून वेगळं करू नये अन माझ्या ‘राजयोगी’लेखणीला माझ्यापासून…!!
दोन वर्षे उलटल्यावर सरकारचं ‘मराठी ग्रामर’ अजूनही बल्यावसतेत आहे…
मी ‘नोटबंदी’ऐवजी ‘नोटबदली’च नाव सुचवलं… म्या, लयं ‘आपलिकेशन’केल्या पण ती बहुर्मुखी सरकार आपलं ऐकत नाय अन स्वतःला ‘लोकसेवक’ समजणारे आपले नेतेही…
बस्स, आता म्या लयं थकले गं…
नको नादीला लागायचं…त्या ‘चार कोडी राजनीतिच्या’…!!
#हल्लाबोल
✍राजयोग
21/12/2018
Leave a Reply
You must be logged in to post a comment.