एकांतवास

मी जरी काही क्षणासाठी प्रसिद्धच्या सिंहासनावर विराजमान होत असेल तरी प्रत्येक व्यक्तीच्या हृदयात मी घट्ट मिठी मारून बसलोय हेही परिस्थिने जाणून घ्यावे… मी शांततेचा, प्रेमाच, वात्सल्याच आणि माणुसकीचा सुगंध विश्वामध्ये प्रसार करण्याचं तोरण बांधतोय तर काळाला पटत नाहीये यावर मी काय करणार…

जीवनाची होडी चालवताना होडी पाण्यात सामावून स्वतःच अस्तित्व नष्ट होणार नाही याची खात्री करावी लागते…

खरंच,
जीवन खुप ‘भन्नाट’ आहे…!!

कोणी मला गोड बोलतंय म्हणून तो/ती माझ्या जवळची आणि कोणी माझे गुणगान गातंय म्हणून तो चांगला…
हे ठरवणारा मी कोण?
ते तस मला बोलणारे कोण?
त्यांचं बोलणं स्वार्थी की निस्वार्थी?
स्वार्थी नाहीस तर त्यागी कशावरून?
ते सत्य तर मी असत्य का?
वा
मी सत्य तर ते असत्य का?
मी मिस्किलपणाने हसलो तर मी त्यांची उडवतोय अस म्हणतात…
आरे मी माणूस आहे…हसणं हे तुझ्या-माझ्या स्वभावातच लिहिलेलं आहे…

मग ते माझ्या शाब्दिक अर्थाचा अनर्थ का करतायेत?
मी माझ्याच चक्करमध्ये…

अन त्यातही त्यांचे मौल्यवान शब्द…!
आत्ता मला वाटतय…

मी थोडं
        एकांतात राहिलं पाहिजे…
        एकांतात जगलो पाहिजे…
फक्त
@एकांतवास…!!

Comments

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.