सत्य

असत्याचा आभाव म्हणजे ‘सत्य’ होय…!!

‘सत्य’ हे प्रकाशासारखं बहुआयामी असतं.

त्याच्यावर कोणाचाही प्रभाव नसतं.

‘सत्या’ला ‘सत्या’पासून वेगळं करता येत नाही.

सत्य-असत्याला पैश्याने खरेदी करता येतं पण ज्या तेजाने काळ्याकट्ट अंधारात दिवा उजळून येतो, ती तेजस्विता त्याच्यात नसते.

‘आपल्या मुठीत सत्य-असत्य आहे’ या खोट्या भ्रमात खरेदीदार जगत असतो.

एकीकडे सत्य मानवी स्वभावाला बोचत तर दुसरीकडे मानवी व्यक्तित्वाला सोन्या-चांदीच मुलामा देत.

सत्य,

अथांग समुद्रावर स्वार होतो…

वाळवंटात निरंतर प्रवास करतो…

चक्रीवादळातून स्वतःचा मार्ग काढतो…

जमीन-अस्मान एक करतो…

स्वर्ग-नर्क पालथं घालतो…

श्रद्धा-अंधश्रद्धा एक करतो…

जन्म-मृत्यू चक्रातून सुटतो…

प्रेम-द्वेष्यावर आपला राजस्व गाजवतो…

कैलाशी गाठतो…

सत्यशोध करतो…

आणि

शेवटी,

        असत्याचा आभाळ फोडून;

        स्वतःच्या सत्य वदणातून सत्य उजागर करतो…!!

26/11/2018

Comments

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.